स्वीकारलेले जर मनाने कुणाला तर मान्य कराव्यात त्रुटी
निःस्वार्थ नात्यात नसाव्यात कधीही अपेक्षा आणि अटी
सोडविली जर आयुष्यातील प्रत्येक कोडी ही सामंजस्याने
नांदेल एकोप्याने सुख-शांती अन् येईल नात्यांत बळकटी
बळावर अतूट विश्वासाच्या जोपासत भाव-भावना मनाच्या
करावा सामना मिळून कधीही माघार नकोच मुळी संकटी
नको साशंक मन कधीच नसावा काळोख हा नैराश्यरुपी
असावी शुद्धी आचरणात सदैवच दूर सारून विचार कपटी
येवोत कितीही भरती-ओहोटी सुख-दुःखांच्या,नसावी चिंता
मनमुरादपणे जगावे आनंद लाटेत आयुष्यारुपी सागर तटी
तेजोमय रहावा देव्हारा जीवनाचा,तेवावा प्रीतदीप असे रुप
पाहता दिसावे उभयतांत जणू विठू-रुख्माई ठेवून कर कटी
शीतल विशाल यादव
-