जीव हा काळाच्या पकडीत आहे आणी जीवाचे शरीर, मन व त्याची भौतिक जगातील सर्व प्रकारची स्थिती म्हणजे जन्म, वृध्दी, क्षय आणी मृत्यू ह्यावर काळाची सत्ता चालते.जीव जसजसा साधना प्रवण होत जातो तसतसा शिव स्थितीत स्थिर होत जातो म्हणजे त्याचे मूळचे जीव स्वरुप हळूहळु शिवस्वरूपातच विलीन होते व अंती तो शिवस्वरुप पूर्णतः प्राप्त करतो.तदनंतर त्याच्या देहरुपी अस्तित्वावर असणारी काळाची सत्ता हळूहळू क्षीण होऊ लागते.शिवस्वरुपाला प्राप्त अशा महात्म्यांच्या भौतिक जीवनाचे नियोजन ही गुरुतत्व अगदी लक्ष देउन करीत असते.
-