वादळ. (मुक्तछंद काव्य)
एक वादळ घोंगावत आहे,
आयुष्याच्या किनाऱ्यावर.
भावनांच्या बेधुंद लाटा स्वार होऊन,
आवेगाने किनाऱ्याला चुंबन घेत आहेत.
वेदनांचा पालापाचोळा पुन्हा उठलाय,
अन् सैरभैर झालाय
मन भरून रान.
हे संवेदनाच वादळ उचंबळून येणार.
तोपर्यंत अस्ताव्यस्त करणार मिटवून बंद केलेल्या आठवणींच्या घराला.
जोपर्यंत त्या घरातून,
विरहात दबलेली आर्त हाक बाहेर येत नाही.
अन् जेव्हा होईल रीते,
नयनांनी तुडुंब भरलेले तळे.
उचंबळून खळ खळ वाहणाऱ्या ,
भाव सरींनी.
तेव्हा कुठे होईल शांत, हे उठलेलं वादळ.
लपेटून मनातील भावनांचा कल्लोळ,
अन उतरेल ओझं,
आठवणींच्या गाठोड्याच.
Miss u Dad..
© (काव्य क्षितिज) Rajesh m sabale.
-