खरचं प्रेम होतं तुझ्यावर !! का? तु समजुन घेतले नाहीस. प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसतं.. तरीही प्रेम सगळेच जण करतात... पण काही जिंकतात तर काही हरतात ... प्रेमात सगळ्यांचीच नजर आतुर असते.. परंतु त्या प्रेमाची भाषाच कळत नसते...
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा.. कारण एक जुनी म्हण आहे, ""जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.. "
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे ""वाट" बघतात... अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात... पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात..
जीवन बदलण्यासाठी वेळ हा सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत, हे जरूर लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी आनंदाने जीवन जगा व दुसऱ्यांना पण आनंदीत ठेवा.
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुले ही सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात..
लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही.... तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे हि खुप महत्त्वाचे आहे...!! माझ्या मुळे तुम्ही नाही तर तुमच्या मुळे मी आहे ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे जोडली जातात. ..
""जलबिंदू वेगळा झाला आणि स्वत:ला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल; पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वत: समुद्र होऊन जाईल." "एकत्र येणे म्हणजे प्रारंभ, एकत्र राहणे ही प्रगती व एकत्र चिकाटीने आणि सातत्याने काम करीत राहणे हेच यशाचे गमक आहे."